कापराची जमात आम्ही, कुणा न कळता उडून जातो…
दुष्ट नव्हे, ना सुष्ठही आम्ही, केवळ येतो निघून जातो…
अर्थशून्य हे अमुचे असणे, तसे निरर्थक विरून जाणे…
अम्हा न ठावे दीप म्हणोनी शांतवृत्तिने तेवत राहणे…
दीप म्हणे हा विझतानाही कसे वाटते सार्थक झालो…
मागे ठेवुन विझल्या वाती, प्रभुच्या चरणी कामी आलो…
आम्ही जळतो क्षणात आणि विझणी अमुची केविलवाणी…
आम्ही जळलो अथवा विझलो नाही हसते रडते कोणी…
मागे ठेवुन क्षीण पोकळी आलो तैसे निघून जातो…
कापराची जमात आम्ही कुणा न कळता उडून जातो…
मार्च २००४